भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नववर्षारंभ होतो. या चैत्र महिन्यापासून शालिवाहन शके १९४२ सुरू झाले असून, यंदाचे संवत्सरनाम शार्वरी असे आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतू सुरू होतो. वसंत ऋतूचा सर्जनशील मानला जातो. या दिवसांमध्ये झाडांना नवीन पालवी फुटते; नवीन मोहोर येतो. सृष्टीचा सृजनोत्सव म्हणून वसंत ऋतूकडे पाहिले जाते. भारतीय संस्कृतीत चैत्र महिन्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. केवळ नववर्ष म्हणून नाही, तर धार्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिक, आरोग्याच्यादृष्टीनेही चैत्र महिन्याचे विशेष महत्त्व आहे. यंदा भारतावर करोना विषाणूचे सावट आहे. करोना व्हायरसविरोधात सर्वांनी एकत्रपणे लढा देण्याची गरज आहे. गुढीपाडव्यानिमित्त सर्वांनी करोनाला पराभूत करण्याचा संकल्प करणे आणि त्याचे प्रामाणिकपणे आचरणे आवश्यक आहे. करोनामुक्त भारताचे लक्ष्य काही दिवसांतच पूर्ण होईल. आगामी वर्ष नव्या संधींचे, आनंदाचे, सुख-समाधानाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, चैतन्याचे जाईल, असा विश्वास व्यक्त करूया. यंदाचे शार्वरीनाम संवत्सर कसे असेल; कोणत्या राशीच्या व्यक्तींना आगामी वर्ष लाभदायक ठरेल; आगामी वर्षात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने कोणती काळजी घेणे आवश्यक ठरेल; याचा ज्योतिषरत्न पूजा प्रसाद जोशी यांनी घेतलेला आढावा...
Trending Articles
More Pages to Explore .....